प्राण तळमळला...
Photo Credit: Indian Express, Migrants walking home from Ahmedabad मूलभूत गरजा पूर्ण करीत किमान सन्मानजनक जीवन जगता यावं हा प्रत्येक सजीवाचा हक्क. स्वतःव्यतिरिक्त इतर प्राण्यांचा तो हक्क मानव म्हणून आपण संधी मिळेल तिथे पायदळीच तुडवतो. परंतु मानवजातीत सुद्धा एका वर्गास, पदोपदी या किमान सन्मानजनक जीवनाचा दुर्दैवानं अभावचं सहन करावा लागतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून काही श्रमिकांची पायी आपल्या स्वगृही परततानाची दृश्यं हे त्याचं ताजं उदाहरण. त्यांच्यावर ही वेळ येण्याची बरेचं जणं आपल्या सोयीची कारणं पुढे करतायत, परंतु या परिस्थितीकडे समग्र कारणांचा परिणाम म्हणून पाहणं गरजेचं आहे. पहिलं आणि सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे सरकारांचं अपयश. मग ती राज्य सरकारे असोत किंवा केंद्र सरकार, प्राप्त परिस्थितीला दोन्ही सरकारे तितकीच जबाबदार. टाळेबंदी नंतर या वर्गामध्ये भीतीचं वातावरण आणि हातावर पोट असल्याने, कामबंदमुळे अस्वस्थता होती. त्यासाठी केंद्र सरकारने जून अखेरपर्यंतची मोफत धान्य पुरवठ्याची घोषणा केली आणि रूढ परंपरेने त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर आली. अशातच केंद्र आणि राज्य...